Tuesday 26 April 2016

यहाँ के हम सिकंदर..

यहाँ के हम सिकंदर...

संजयकुमार डव्हळे(तहसीलदार).
राज्यात 5 वा.

एकदम बिनधास्त माणूस...
मित्रांत संजूबाबा म्हणून ओळख.
मिमिक्री हा छंद, त्यामुळे मित्रांमध्ये लोकप्रियाताही खूप लाभली.
माझी पहिली भेट Interview Group निमित्ताने  सन 2014 मधे झाली.
सुरुवातीला जास्त बोलायचा नाही, पण हळूहळू खुलला की एकदम रसिक माणूस.
खेडीपाडी आणि छोट्या शहरातील talent च ज्वलंत उदाहरण. प्रत्येकानं यात स्वतःला शोधावं अशी pure ग्रामीण touch असलेली भाषा, शिवाय त्याचा अभिमानही. संपर्कात आलेल्या प्रत्येक ग्रामीण  विद्यार्थ्याला वाटते हा आपल्यासारख्याच आहे, आपणही अधिकारी होऊ शकतो.
मूळ गाव जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराजवळ शारा, जिल्हा बुलढाणा.
शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत झालेलं, त्यानंतर D.Ed केलं.
डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी खर्च पडणारे वर्षे व लागणारा खर्च यामुळे अनेक हुशार विद्यार्थी मधल्या काळात D.Ed कडे वळले, यात पटकन नोकरी हे अमिषही होत.पण कालांतराने D. Ed संदर्भात राज्यातील परिस्थिती वेगाने बदलत गेली आणि वरील विशेष संदर्भ घेऊन या क्षेत्राकडे गेलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बहि:स्थ BA ची पदवी घ्यायची आणि तीन वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा,असा अलिखित नियमच बनला. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे या प्रवाहातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी UPSC आणि MPSC यांतील परीक्षांत लक्षणीय यश मिळवलंय.
हे व्यक्तिमत्व सुद्धा यापैकीच एक.
सन 2014 यावर्षी विक्रीकर निरीक्षक(STI),
सन 2015 यावर्षी नायब तहसीलदार,
सन 2016 यावर्षी तहसीलदार.
(राज्यात रँक आहे 5 वी)

यावर्षी उपजिल्हाधिकारी हे पद खुल्या प्रवर्गासाठी नसल्यामुळे मिळू शकले नाही आणि पोलीस प्रशासनाविषयी आदर असूनही वयक्तिक आकर्षण नसल्यामुळे Dy.SP/ACP या पदाचा पसंतिक्रम वर दिलाच नाही.परिणामी तहसीलदार पदी निवड झाली.
गेल्यावर्षी वर्ग 2 चे पद मिळाल्यावर joining ऐवजी extension साठी मी विचारल्यावर संजयने लगेचच होकार दिला.
त्यावेळी आम्ही एक सूत्र ठरविले होते..
"आणखी एक वर्ष अभ्यासाला देवून promotion साठी लागणारे 10 वर्षे वाचवायची".
सन 2016 यावर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने लावलेल्या result ने आमची व्यूहरचना योग्य असल्याचे सिद्ध केले.नायब तहसीलदार ते तहसीलदार हा अनेक वर्षांचा प्रवास एका वर्षात कापला गेला.
मराठी आणि इंग्रजी या लेखी स्वरूपात असलेल्या भाषा विषयात गुणांचा फटका बसला,या दोन विषयात कमी गुण आले. तरीही राज्यात 5 वी rank आली.
इतिहास,खेळ आणि परीक्षा यांत जर-तर ला काहीही scope नसला तरीही ...
जर भाषा विषयात average गुण आले असते तरी राज्यात पहिली rank आली असती,आणि...
आमचा अंदाज खरा ठरला असता, पण...
भाषा विषयांच्या अनिश्चिततेचा फटका बसला आणि आमचा अंदाज चुकला.
काहीही असो,
सर्वांना आपलेच प्रतिनिधित्व करतोय असे वाटणारा हा व्यक्ती आज महाराष्ट्राच्या प्रशासनात आज एका महत्त्वाच्या पदावर पोहोचलयं.
एखादी गोष्ट मनावर घ्यायची नाही आणि घेतली तर मागे हटायचे नाही या गुणविशेषामुळे सुंदर यश मिळाले.
पूर्व परीक्षेला कमी score असल्यामुळे पूर्वपरीक्षेचा result येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करण्याची सगळी उणीव नंतर अशी काही भरून काढली की त्याचं नाव अभ्यास. 24×7 अभ्यास.
पूर्व परीक्षेचा result लागल्यानंतर झालेली आमची पहिली भेट आणि त्यातील संजयचे एक वाक्य मला नेहमी आठवते...
"सर,तुम्ही बघाच आता मी काय करतो ते..."
या वाक्याची सिद्धता आयोगाची अंतिम यादी लागल्यावर सर्वांना आली.
आपल्यातीलच एक चांगल्या rank ने तहसीलदार बनला,असे विद्यार्थ्यांना वाटू लागले.
आत्मविश्वास, स्वतःच्या बलस्थानांची व्यवस्थित जाणीव,अभ्यासाचे योग्य नियोजन, कष्ट उपसण्याची तयारी,प्रामाणिकपणा या गुणांनी हा व्यक्ती यशापर्यंत पोहोचला.

Wednesday 13 April 2016

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची...एका मुलाकडून...

श्री.नारायण मिसाळ: उपमुख्य कार्यकारी अधिकारी      (जि. प.)
    
कोणत्याही नोकरदार वडिलांचे एक स्वप्न असते. एक सुंदर स्वप्न. आपला मुलगा आपल्या विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून यावा. आपल्या वरिष्ठांच्या खुर्चीत वडील नेहमी आपल्या मुलाला पाहत असतात. तलाठी वडिलांना वाटते मुलगा प्रांताधिकारी व्हावा, पोलीस कर्मचाऱ्यांना वाटते मुलगा Dy.SP, IPS व्हावा, ग्रामसेवकांना वाटते मुलगा CEO किंवा Dy.CEO व्हावा.
आता 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने  लावलेल्या अंतिम यादीत अशाच एका वडिलांची स्वप्नपूर्ती झाली.
बीड जिल्हा परिषेदेत ग्रामसेवक म्हणून आपली सेवा बजावून निवृत्त झालेल्या श्री. बाबासाहेब मिसाळ यांचा मुलगा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Dy.CEO) झाला. वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद या नारायनरावांनी रात्रभर गुलाल उधळून, भर उन्हाळ्यात रात्रीच्यावेळी मंद,थंड वारे अंगावर झेलणाऱ्या पुण्यातील रस्त्यावर गरम चहाचे कप पोटात रिचवत मित्रांसोबत एक उत्सव म्हणून साजरा केला. या उत्सवात स्वतःच्या ध्येयपूर्तीच्या आनंदापेक्षा वडिलांच्या स्वनापूर्तीचा आनंद जास्त होता.
यांचं मूळ गाव खोकरमोह ता.शिरूर(का),जि. बीड हे आहे. पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नंतर D.Ed करून काही वर्षे शिक्षण सेवकाची नोकरीही केली. ही नोकरी करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA केलं.
स्पर्धा परीक्षांची गोडी लागल्यावर 'दररोज अभ्यास' हा साधा, सोपा फॉर्म्युला वापरून भरपूर अभ्यास केल्यावर   विक्रीकर निरीक्षक(STI) म्हणून निवड झाली. खरं म्हणजे ही निवड स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा take off point ठरली.स्पर्धेच्या युगात वेगवान प्रवासाची नवीन उमेद निर्माण झाली.
आईवडिलांची काळजी आणि स्वतः ची नोकरी या दोन्ही आघाड्या सांभाळत दिलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या 2013 या वर्षीच्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल गेली पण मुलाखतीला केवळ 41 गुण आल्यामुळे back to pavillion चा प्रकार घडला.
सन 2015 यावर्षी झालेल्या मुख्य परीक्षेत 600 पैकी 246 असा छान score आला.
The Unique Academy मध्ये आम्ही स्थापन केलेल्या Interview Group ला यांचा प्रवेश योगायोगानेच झाला.पहिल्या भेट झाल्यावर,हे व्यक्तिमत्त्व एवढं मवाळ, सौम्य, मितभाषी असल्यामुळे यांचं कसं होणार? ही चिंता माझ्या मनाला स्पर्श करून गेली,पण याबरोबरच मागील मुख्य परीक्षेचा अनुभव, यावर्षीचा चांगला score यामुळे मुलाखतीला चांगले गुण आल्यास  वर्ग 1 चे पद मिळण्याची खात्रीही निर्माण झाली.
या व्यक्तिमत्वात मी हेरलेला चांगला गुण म्हणजे चूक निदर्शनाला आणून दिल्यानंतर प्रत्येक चूक सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न होय.
बोलण्यात स्पष्टता,देहबोलीत आत्मविश्वास, ज्ञान मांडणीत अचूकता यावी; मन शांत, स्थीर होऊन मानसिक ताणतणाव नाहीसा व्हावा म्हणून Art of Living Foundation च्या Youth Leadership Training Programme (YLTP) या कोर्ससाठी जाण्याची सूचना मी केल्यावर यांनी एका क्षणात होकार दिला.
जेथून जे चांगलं मिळेल ते वेचण्याच्या वृत्तीमुळे यश अधिक जवळ येत गेलं.यावेळी आयोगाच्या सन्माननीय सदस्यांनी  यांची मुलाखत stress interview या प्रकारात घेतली. कोणालाही नकोनकोस असलेल्या या प्रकारच्या मुलाखतीत आत्मविश्वास, व्यक्तिमत्वातील ठामपणा इत्यादी बाबी तपासल्या जातात. कधीकधी गुण ही कमी येतात. पण यावेळच्या Group Activities मुळे मानसिक सक्षमता खूपच आली होती.
परिणामी 25 मिनिटे चाललेल्या या stress interview मध्ये आयोगाने चक्क 60 गुण देऊन, वडील आणि मुलाच्या स्वप्नांना वास्तव आकार दिला.

आईवडिलांच्या डोळ्यांत मुलांमुलींसाठी खरी प्रेरणा दडलेली असते,हा दृढ विश्वास या संघर्षातून सिद्ध झाला.

मनोहर भोळे,
"राजमुद्रा", "अटेंशन प्लीज", आणि
"अभ्यास ते अधिकारी" या पुस्तकांचे लेखक.

Monday 11 April 2016

सातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम..

सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं!

दिनांक 5 एप्रिल 2016.
राज्यसेवेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यात झळकलेल्या एका नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अगदी हे नाव आलेल्या व्यक्तीच्यासुद्धा.

प्रियांका ढोले-तहसीलदार, असं हे नाव.

   महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील तहसीलदार हे एक महत्त्वाचे पद यांच्या नावापुढे कायमचे चिकटले.
एक रंजक कथाच आहे ही.
या मूळच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या कळंबी या गावच्या. सन 2010 या वर्षी इंजिनीयरिंग झालेलं. लगेचच स्पर्धा परिक्षांकडे  मोर्चा वळविला. तेंव्हापासून 2016 पर्यंत UPSC च्या तीन तर MPSC च्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या.
दरम्यानच्या काळात विक्रीकर निरीक्षक (STI) हे पद मिळाले, त्यामुळे सध्या मुंबईत कार्यरत.
गेल्यावर्षी Dy.SP चे पद केवळ एका गुणाने गेले.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनिश्चितता परत अनुभवास आली.

आता खरी कथा येथून सुरु होते.

या NT(D) या प्रवर्गात मोडतात. 2015 यावर्षीच्या पूर्वपरीक्षेत या प्रवर्गातील मुलींसाठी वर्ग 1 ची एकही जागा नसल्यामुळे यातील अनेक मुलींनी खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल केले. यांनी मात्र अनवधानाने/चुकीने NT(D) मध्ये अर्ज भरला.
जेंव्हा वर्ग 1 ची एकही जागा नाही हे लक्षात आले तेंव्हा काय करावं काही सुचत नव्हतं. डोकं धरून बसण्याची वेळ आली.आयोगाच्या नियमानुसार पूर्व परीक्षेच्या फॉर्ममध्ये नंतर बदल करता येत नाही. तरीही यांनी थेट आयोगाचे कार्यालय गाठले. स्वतःला खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये टाकण्यासाठी आयोगाकडे अनेक अर्ज विनंत्या केल्या, एवढेच नव्हे तर आयोगात माहिती अधिकारही (RTI) वापरले. पण या सगळ्या धावपळीचा काहीच फायदा झाला नाही. नियमानुसार वर्गवारीत बदल करण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला.
वर्ग 1 च्या एकही जागेसाठी आपण पात्र नाही म्हणून अभ्यासातील सगळा मूडच गेला. परिणामी पूर्व परीक्षा सहज पास होऊनही एक औपचारिकता म्हणून दिलेल्या मुख्य परीक्षेत 600 गुणांपैकी केवळ 170 गुण आले. हा प्रयत्न व्यर्थ जाणार हे स्पष्ट झाले.
दरम्यानच्या काळात एक नाट्यमय घटना घडली.....
या प्रवर्गातील मुलांसाठी असलेले "तहसीलदार" हे पद मुलींसाठी वर्ग करण्यात आले. म्हणजे मुलींसाठी तहसीलदार हे पद देण्यात आले.
यांच्यापैकी यांच्या प्रवर्गात 35 आणि 50 गुण जास्त असलेल्या काही मुली होत्या, पण त्यांनी खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये अर्ज भरल्यामुळे या प्रवर्गातील तहसीलदार या पदासाठी या मुली पात्र नव्हत्या.
या काळात "द युनिक अकॅडमी"त आम्ही सुरु केलेल्या Interview Group ला प्रवेश मिळावा म्हणून यांनी माझी भेट घेतली. यावेळी मी यांना दोन प्रश्न विचारले..
1) तुमचा score किती?
2)तुमच्या ओळखीतील, तुमच्या प्रवर्गातील मुलींचे score किती?
    यावेळी एक बाब लक्षात आली की यांच्यापेक्षा अनेक जास्त score असले तरी त्या बहुतांशी मुलींनी वर्ग 1 ची जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला होता. म्हणून त्या मुली या नवीन समाविष्ट पदासाठी पात्र नव्हत्या.
म्हणजेच.....
नवीन समाविष्ट झालेले तहसीलदार हे पद यांना मिळेल याची निदान मला तरी खात्री झाली होती. परिणामी 100 गुणांच्या मुलाखतीवर आम्ही खूपच लक्ष दिले. कसून सर्व केला, काहीही मागे ठेवले नाही, मुलाखतीच्या सर्व सत्रांसाठी या दर आठवड्याला मुंबईहून यायच्या.ऑफिस सुटले कि केवळ 4 तासात पुण्यात Interview Group ला हजर.कितीही धावपळ झाली तरी नक्की येणारच.
साधारणतः चार महिने हि धावपळ चालू होती. छोट्या छोट्या उणिवा शोधून आम्ही त्या दूर केल्या.
या सगळ्या गोष्टींचा असा काही परिणाम झाला की राज्यसेवा मुलाखतीत थेट 62 गुण आले, आणि...

स्वतःचा स्वत:विषयीचा आणि इतरांचा अंदाज चुकवत ही स्वारी "तहसीलदार" बनली.
निवडयादी प्रसिद्ध झाल्यावर मी अभिनंदनासाठी फोन केला.
यांचं उत्तर होता...
"सर, चमत्कारच झाला, तुमचं म्हणणं खरं ठरलं".
विद्यार्थी मित्रहो याला काय म्हणाल?...
नशीब ,luck, आईवडिलांची पुण्याई की MPSC चा आशीर्वाद की आणखीन काही..
माझं मत आहे की, सातत्यपूर्ण अभ्यास, एखादी गोष्ट मनाला पटल्यावर केलेली अपार मेहनत या बाबी नशिबाला सुध्दा आपल्याकडे ओढून आणतात आणि आपल्याला यशाकडे घेऊन जातात.
म्हणून मी या लेखाला शीर्षक दिलंय...
"सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं|"
All the Best.